वेड सह्याद्रीच: ढाक बहिरी...!
दोन महिने आमच्या लिस्ट मध्ये असलेला प्लॅन. मुंबईतुन पुण्यात शनिवारी जाणं झालं आणि सगळं इथंच घोड्याने पेंड खाल्लं. ट्रेकिंगचा बेत रविवारी ठरला आणि जमतील ती पोरं घेऊन Sunday morning ला आम्ही बाहेर पडलो. लोणावळ्याकडून गेल्यामुळे आम्हाला हे लांबच पडलं. पण तरीही सगळं आवाक्यात होतं. जातानाच two-wheeler च्या रोड ने google मॅप ने आम्हाला शेतातून वाट दाखवली ती पुढे जाऊन बंद पडली. वाट विचारत-विचारत आम्ही सांडशी गावात पोहचलो.
गावची लोकं तशी चांगलीच भेटली. गाड्या पार्क करून दुपारच्या जेवणाचं सांगून आम्ही ट्रेकचा श्रीगणेशा केला. १० वाजले होते आणि २-३ पर्यंत यायचं असा "साधा सरळ" प्लॅन होता. पण असले प्लॅन आमच्या नशिबाने कधीच फाट्यावर मारलेत हे आम्ही विसरलोच. आम्ही वाट चुकलो; सुरवातीला नव्हे, सुरवात व्हायच्या आधीच चुकलो. आणि हे आम्हाला खूप नंतर समजलं. गावकर्यांना विचारून आम्ही ज्या सुळख्याकडे जायायच विचारलं होतं तिकडे आम्ही जात असताना आमची वाट संपली आणि पुढे कडा दिसला. आता हा कडा सर करायचा म्हंटल्यावर सगळ्यांचा हुरूप वाढला. जो-तो त्या जंगलात वाटा शोधू लागला. मला जी वाट सापडली ती चढायला अवघड तर होतीच पण निसरट पण होती, भरीत भर म्हणून जो दगड धरून वर चढायला ठरवायचो तो फुटून हाथात यायचा. असल्यातून वर आलो आणि खाली सांगितलं कि इथून येऊ नका दुसरी वाट बघा. त्यामुळे एक-दोन गेलीत दुसरीकडे वाट शोधायला. वर जाऊन बघितलं तर वाट कुठेच नाहीय, जिथून मी आलो तीही वाट नव्हतीच. वारं थांबून थोडं शांत झाल्यावर एक आवाज ऐकू आला, "मी अडकलोय - मी अडकलोय ". tilya कुठंतरी वाट शोधायला गेला आणि अडकून बसला. वरही जाता येईना अन खालीही येता येईना, अन हालताही येईना. अंदयाने जाऊन त्याला तिकडूनच कसतरी वर आणलं. बुटं गळ्यात अडकून वाघ वर चढला होता आणि येऊन रेड्यासारखा खाली पडला होता. इकडं खालच्यांना वर आणायचा काम चालूच होतं. रोहण्याने पाठीवरची बॅग काढून वर माझ्याकडे फेकली ती माझ्याकडे आलीच नाही. तशीच ती परत खाली पडत पडत गेली. शेवटी मी आणि अंदया खाली गेलो अन सगळ्यांना वर घेतलं. त्या भर उन्हात मला एक एकलर्सच चॉकलेट सापडलं, तेवढाच खुश होऊन खाल्लं. थोडं काली गेलो तर चिल्लर पडलेली सापडली, मग कंगवा, मग नॅपकिन. खाली जाऊन बघतोय तर बॅग ची चैन तुटून त्यातलं सामान सगळं बाहेर पडत आलं होतं. सगळं शोध घेतला आणि गाडीची चावी आणि wallet तेवढं शोधलं आणि वर आलो.
इथून पुढं पण सीन असाच. काही बदल नाही. वाट शोधत-शोधत एका कड्याजवळ आलो. हा खूप मोठा कडा असल्यामुळे चढणे काय शक्य नव्हते. त्या डोंगराला लागून लागूनच आम्ही चालायला लागलो. इतके चाललो इतके चाललो कि आम्हाला पण आता जरा जास्तच वाटायला लागलं. कारण आतापर्यंत वाट सापडायला हवी होती. पाणी तर कधीच संपलं होतं पण मघासारखा हुरूप अजूनही होताच त्यामुळे वाट सापडत नसली तरी शोधायची हुक्की होतीच. शोधता-शोधता पूर्ण डोंगराला पालथा घातला पण वाट काही सापडली नाही. शेवटी नाईलाजाने परत जावं लागणार होतं अन त्याचीच चर्चा करत असताना कोणाचातरी आवाज आला. त्या आवाजाच्या दिशेने जाऊन त्या लोकांना थांबवून वाट मिळवली. finally वाट सापडली, तब्बल ९.५ किमी च्या खडतर पायी प्रवासानंतर.
त्या लोकांकडून समजलं कि अजून खूप लांब आहे. जवळपास अर्धा पल्ला, पण या ट्रेक ला असं अजिंक्य सोडायचं नव्हतंच. ३ वाजले होते, १० वाजल्यापासून आम्ही फिरत होतो, ट्रेक तर complete करायचाच होता, हट्टच होता तो. बिनापाण्याचा तिथून पुढचा प्रवास आम्हाला रडकुंडीला आणत होता. कितीतरी stops घेतले पण ४:३० पर्यंत आम्ही पोह्चलोच. पण पायथ्याशी आल्यावर इथपर्यंत जे काही केलं त्याच सार्थक झाल्यासारखं वाटलं. मी-मी म्हणाऱ्याची फाटेल अशी ती चढाई, फक्त रस्सी चा आधार, महिलांना सक्त परवानगी का नाही हे डोळ्याने दिसत होतं. ट्रेक करताना असाच काहीतरी उराशी बाळगून असतो आम्ही, अश्यावेळी मनातली उंचावरची भीती अनुभवायची संधी मिळते. आणि हि संधी सोडू वाटत नाही... बाकी शब्दात सांगणं कठीण, तुम्ही स्वतः अनुभवा.
दोन महिने आमच्या लिस्ट मध्ये असलेला प्लॅन. मुंबईतुन पुण्यात शनिवारी जाणं झालं आणि सगळं इथंच घोड्याने पेंड खाल्लं. ट्रेकिंगचा बेत रविवारी ठरला आणि जमतील ती पोरं घेऊन Sunday morning ला आम्ही बाहेर पडलो. लोणावळ्याकडून गेल्यामुळे आम्हाला हे लांबच पडलं. पण तरीही सगळं आवाक्यात होतं. जातानाच two-wheeler च्या रोड ने google मॅप ने आम्हाला शेतातून वाट दाखवली ती पुढे जाऊन बंद पडली. वाट विचारत-विचारत आम्ही सांडशी गावात पोहचलो.
गावची लोकं तशी चांगलीच भेटली. गाड्या पार्क करून दुपारच्या जेवणाचं सांगून आम्ही ट्रेकचा श्रीगणेशा केला. १० वाजले होते आणि २-३ पर्यंत यायचं असा "साधा सरळ" प्लॅन होता. पण असले प्लॅन आमच्या नशिबाने कधीच फाट्यावर मारलेत हे आम्ही विसरलोच. आम्ही वाट चुकलो; सुरवातीला नव्हे, सुरवात व्हायच्या आधीच चुकलो. आणि हे आम्हाला खूप नंतर समजलं. गावकर्यांना विचारून आम्ही ज्या सुळख्याकडे जायायच विचारलं होतं तिकडे आम्ही जात असताना आमची वाट संपली आणि पुढे कडा दिसला. आता हा कडा सर करायचा म्हंटल्यावर सगळ्यांचा हुरूप वाढला. जो-तो त्या जंगलात वाटा शोधू लागला. मला जी वाट सापडली ती चढायला अवघड तर होतीच पण निसरट पण होती, भरीत भर म्हणून जो दगड धरून वर चढायला ठरवायचो तो फुटून हाथात यायचा. असल्यातून वर आलो आणि खाली सांगितलं कि इथून येऊ नका दुसरी वाट बघा. त्यामुळे एक-दोन गेलीत दुसरीकडे वाट शोधायला. वर जाऊन बघितलं तर वाट कुठेच नाहीय, जिथून मी आलो तीही वाट नव्हतीच. वारं थांबून थोडं शांत झाल्यावर एक आवाज ऐकू आला, "मी अडकलोय - मी अडकलोय ". tilya कुठंतरी वाट शोधायला गेला आणि अडकून बसला. वरही जाता येईना अन खालीही येता येईना, अन हालताही येईना. अंदयाने जाऊन त्याला तिकडूनच कसतरी वर आणलं. बुटं गळ्यात अडकून वाघ वर चढला होता आणि येऊन रेड्यासारखा खाली पडला होता. इकडं खालच्यांना वर आणायचा काम चालूच होतं. रोहण्याने पाठीवरची बॅग काढून वर माझ्याकडे फेकली ती माझ्याकडे आलीच नाही. तशीच ती परत खाली पडत पडत गेली. शेवटी मी आणि अंदया खाली गेलो अन सगळ्यांना वर घेतलं. त्या भर उन्हात मला एक एकलर्सच चॉकलेट सापडलं, तेवढाच खुश होऊन खाल्लं. थोडं काली गेलो तर चिल्लर पडलेली सापडली, मग कंगवा, मग नॅपकिन. खाली जाऊन बघतोय तर बॅग ची चैन तुटून त्यातलं सामान सगळं बाहेर पडत आलं होतं. सगळं शोध घेतला आणि गाडीची चावी आणि wallet तेवढं शोधलं आणि वर आलो.
इथून पुढं पण सीन असाच. काही बदल नाही. वाट शोधत-शोधत एका कड्याजवळ आलो. हा खूप मोठा कडा असल्यामुळे चढणे काय शक्य नव्हते. त्या डोंगराला लागून लागूनच आम्ही चालायला लागलो. इतके चाललो इतके चाललो कि आम्हाला पण आता जरा जास्तच वाटायला लागलं. कारण आतापर्यंत वाट सापडायला हवी होती. पाणी तर कधीच संपलं होतं पण मघासारखा हुरूप अजूनही होताच त्यामुळे वाट सापडत नसली तरी शोधायची हुक्की होतीच. शोधता-शोधता पूर्ण डोंगराला पालथा घातला पण वाट काही सापडली नाही. शेवटी नाईलाजाने परत जावं लागणार होतं अन त्याचीच चर्चा करत असताना कोणाचातरी आवाज आला. त्या आवाजाच्या दिशेने जाऊन त्या लोकांना थांबवून वाट मिळवली. finally वाट सापडली, तब्बल ९.५ किमी च्या खडतर पायी प्रवासानंतर.
त्या लोकांकडून समजलं कि अजून खूप लांब आहे. जवळपास अर्धा पल्ला, पण या ट्रेक ला असं अजिंक्य सोडायचं नव्हतंच. ३ वाजले होते, १० वाजल्यापासून आम्ही फिरत होतो, ट्रेक तर complete करायचाच होता, हट्टच होता तो. बिनापाण्याचा तिथून पुढचा प्रवास आम्हाला रडकुंडीला आणत होता. कितीतरी stops घेतले पण ४:३० पर्यंत आम्ही पोह्चलोच. पण पायथ्याशी आल्यावर इथपर्यंत जे काही केलं त्याच सार्थक झाल्यासारखं वाटलं. मी-मी म्हणाऱ्याची फाटेल अशी ती चढाई, फक्त रस्सी चा आधार, महिलांना सक्त परवानगी का नाही हे डोळ्याने दिसत होतं. ट्रेक करताना असाच काहीतरी उराशी बाळगून असतो आम्ही, अश्यावेळी मनातली उंचावरची भीती अनुभवायची संधी मिळते. आणि हि संधी सोडू वाटत नाही... बाकी शब्दात सांगणं कठीण, तुम्ही स्वतः अनुभवा.